आता जगायाचे असे माझे किती क्षण राहिले ? माझ्या धुळीचे शेवटी येथे किती कण राहिले ? हदुयात विझला चंद्रमा .... नेत्री न उरल्या तारका .... नाही म्हणायाला तुझे हे आपुलेपण राहिले ! अजुनी कुणास्तव तेवतो हा मंद प्राणाचा दिवा ? अजुनी मला फसवायला कुठले निमंत्रण राहिले ? ते लोक होते वेगळे घाईत जे गेले पुढे .... मी मात्र थांबुन पाहतो- मागे कितीजण राहिले ? कवटाळुनी बसले मला दाही दिशांचे हुंदके (माझे अता दुःखासवे काही न भांडण राहिले !) होता न साध्य एवढा जो शब्द मी तुजला दिला एकाच शब्दाला उभे आयुष्य तारण राहिले ! अवघ्या विजा मी झेलल्या, सगळी उन्हे मी सोसली ... रे बोल आकाशा, तुझे आता किती पण राहिले ? ओसाड माझे घर मुळी नाही बघायासारखे हे आसवांचे तेवढे अद्याप तोरण राहिले ! |
.....सुरेश भट
No comments:
Post a Comment